Home महाराष्ट्र कोरोना : महाराष्ट्र सरकार आमच्या सोबत खोटं बोलले, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर...

कोरोना : महाराष्ट्र सरकार आमच्या सोबत खोटं बोलले, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

0

संपूर्ण जग कोरोना विषाणू विरूद्ध लढाई लढत आहे. कोरोनाचा संसर्ग प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन केले गेले आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी सर्व राज्ये आपापल्या स्तरावरही कार्यरत आहेत. एका हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नांदेडहून आलेल्या भाविकांसाठी महाराष्ट्र सरकार वर हल्ला बोल केलाय.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, नांदेड मध्ये अडकलेल्या भाविकांच्या कोरोना टेस्टबाबत महाराष्ट्र सरकारने आम्हाला खोटं सांगितलं. त्यांनी आम्हाला सांगितले की आमच्या लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे, परंतु भाविकांची कसलीही टेस्ट झालेली नाही. जर आम्हाला माहित असते तर आम्ही आमच्याकडे चाचणी केली असती.

कॅप्टन अमरिंदर पुढे म्हणाले की, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सर्व भाविकांची कोरोना टेस्ट झाली असल्याचं सांगण्यात आलं, मात्र यापैकी कोणत्याच भाविकांची कोरोना टेस्ट करण्यात आली नव्हती. मात्र त्या नंतरच मी नांदेड हुजूर साहिबला 80 बस पाठवल्या. आम्हाला वाटले की तेथे 1500 लोक असतील, परंतु जेव्हा बस आली तेव्हा तेथे 3000 हून अधिक लोक आढळले या नंन्तर या सर्वांना पंजाबला रवाना करण्यात आले.
 
आता पर्यंत नांदेड हून पंजाबला जाणाऱ्या भाविकांची संख्या 7 हजार झाली आहे. लोक महामार्गा वरून येण्या ऐवजी पोलिसांना चकमा देणा रस्त्यावरून जात आहेत, परंतु सरकारने त्यांना पकडले. असं यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अम्रिदार सिंग यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, नांदेडमधील यात्रे करूंची चाचणी घेण्यात येत आहे. दररोज आम्ही 1500 चाचण्या घेत आहोत. बर्‍याच लोकांची चाचणी घेण्यात वेळ लागत आहे आणि किंमत ही जास्त आहे. आत्ता पर्यंत आम्ही भाविकांना निरीक्षणा खाली ठेवले आहे.