
महत्वाचं म्हणजे यात यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम आणि वर्धा या 6 जिल्ह्यांत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. लोकसत्तानं दिलेल्या बातमी नुसार या 6 जिल्हय़ापैकी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
मीडिया रिपोट नुसार विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये मागील 11 महिन्यात सुमारे एक हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
आत्महत्येचे आकडे खालील प्रमाणे…
यवतमाळ जिल्ह्यात 249
बुलडाणा 246
अमरावती 238
अकोला 106
वाशीम 90
वर्धा जिल्ह्यात 75
देशाचीच नाही तर जगाची भूक भागावणार शेतकरी अशी आत्महत्या करत राहिला तर भविष्य संकटात आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीतरी तरतूद करायला हवी.