Home राजकीय अमित शाह म्हणाले, “नेहरूंची ती चूक हिमालयाहून मोठी”

अमित शाह म्हणाले, “नेहरूंची ती चूक हिमालयाहून मोठी”

0

माजी सरकारी अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “काश्मीरचा इतिहास मोडून-तोडून देशासमोर ठेवला गेला, कारण ज्यांची चूक होती त्यांनी हा इतिहास लिहिला. स्वत:ची चूक झाकण्यासाठी चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला. मात्र आता खरी वेळ आली आहे की जनतेसमोर काश्मीरचा खरा इतिहास मांडला जाईल.” लोकमतने या बातमीवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. शाहांची ही जबर टीका पुढे काय वळण घेणार हे वेळच ठरवेल.

एवढ्यावर अमित शाह थांबले नसून ,”काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. हे कलम हटवण्यासाठी आम्ही अनेक वर्षं संघर्ष करत होतो. ज्यावेळी आपलं सैन्य जिंकत होतं त्यावेळी युद्धविराम का दिला गेला? त्यावेळी युद्ध थांबवण्याची काय गरज होती? संयुक्त राष्ट्राकडे जाण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घेतला. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. नेहरूंची ही चूक हिमालयाहून मोठी होती. हा दोन्ही देशांमधला वाद होता”, असे शाह यांनी वक्तव्य केलं आहे.