Home राष्ट्रीय इंजिनीअरिंग कॉलेजेस मध्ये कोणतेही शुल्क परिस्थिती सामान्य होईपर्यंत घेतले जाणार नाही :...

इंजिनीअरिंग कॉलेजेस मध्ये कोणतेही शुल्क परिस्थिती सामान्य होईपर्यंत घेतले जाणार नाही : तंत्रशिक्षण परिषद (AICTE)

0


अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ( एआयसीटीई ) ने त्यांच्याशी सर्व संलग्न महाविद्यालयांना या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, ‘देशात लॉकडाऊन पूर्ण होईपर्यंत आणि परिस्थिती पुन्हा सामान्य होईपर्यंत एआयसीटीईशी संबंधित कुठल्याही अभियांत्रिकी / तांत्रिक महाविद्यालय किंवा संस्था त्यांच्या विद्यार्थ्यांना / पालकांवर शुल्क भरण्यास दबाव आणणार नाही.’

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ( एआयसीटीई ) ने सर्व संलग्न महाविद्यालयांना या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली आहे. 

तसेच एआयसीटीईने असे आश्वासन दिले आहे की लॉकडाऊन दरम्यान प्राध्यापक व अन्य कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कोणताही विलंब होणार नाही. काही संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देत नसल्याचा अहवाल मिळाल्यानंतर परिषदेने हे पूर्ण स्पष्ट केले आहे.
एआयसीटीईने महाविद्यालये / संस्थांना त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांनाही इंटरनेट सुविधा सुध्दा शेअर करण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा सुरळीत नाही अशा भागातील विद्यार्थ्यांसाठी हजेरीत सवलत देण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे.