Home राष्ट्रीय कोरोनाच्या विरुद्ध मोदी सरकारचा तीन टप्प्यातील मास्टरप्लॅन रेडी, लढाई चालणार २०२४ पर्यंत

कोरोनाच्या विरुद्ध मोदी सरकारचा तीन टप्प्यातील मास्टरप्लॅन रेडी, लढाई चालणार २०२४ पर्यंत

0

कोरोना व्हायरसच्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने तीन टप्प्यांचा एक विशेष प्लान तयार केला आहे. आपातकालीन परिस्थिती आणि आरोग्य व्यवस्थेच्या सर्व तयारीसाठी मोदी सरकारने राज्यांना विशेष पॅकेज जारी केलं आहे. केंद्रीय आणि राज्य स्तरावरील आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा या पॅकेज मागचा उद्देश आहे.

आता या पॅकेजमुळे राज्यांना अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे आणि औषधे खरेदी सहज करता येतील तसेच Covid-19 च्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याची क्षमता निश्चितच वाढवता येणार आहे. केंद्र सरकारने करोनाविरोधात दीर्घकाळ लढाईच्या दृष्टीने तयारी केली आहे. तीन टप्प्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलजबजावणी केली जाणार आहे.पहिला टप्पा हा जानेवारी २०२० ते जून २०२०, दुसरा जुलै २०२० ते मार्च २०२१ आणि तिसरा टप्पा एप्रिल २०२१ ते मार्च २०२४ असा असेल.

“कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्य स्तरावरील आरोग्य यंत्रणा अत्यंत मजबूत करणे, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची खरेदी तसेच टेहळणी क्षमता वाढवणे त्याचबरोबर प्रयोगशाळांची संख्या वाढवत जाणे हा Covid-19 आपातकालीन योजनेमागचा उद्देश आहे” असे केंद्राने पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

जानेवारी २०२० ते जून २०२० या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य मोहिमेतंर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. आता पहिल्या फेजमध्ये Covid-19 साठी खास रुग्णालयांची उभारणी, आयसोलेशन वॉर्डस, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनसह आयसीयू कक्ष, प्रयोगशाळा सक्षमीकरण, अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल असे कळते.