
ऑस्त्रलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने ‘भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ हे क्रिकेटचा खेळ वेगळ्या पातळीवर नेण्याचे सामर्थ्य जोपासतात’ असा विश्वास दाखविला आहे.
२१ तारखेला सुरू होणाऱ्या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सलामी सामन्यावर सर्वांचेच लक्ष राहील, हा सामना सिडनीच्या शोग्राऊंड मैदानावर होणार आहे.
यंदाच्या टी-20 विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळाले आहे तर तेथील सिडनी, पर्थ, मेलबर्न आणि कॅनबेरा येथील विविध मैदानांवर या विश्वचषकातील सामने खेळले जातील.