सद्या कोरोनाच्या प्रभावामुळे विविध ठिकाणी सरकारचे अनेक कामे चालू आहेत. तसेच, कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मानस कोकण रेल्वे प्रशासनाचे रत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबरपर्यंत या मार्गावर विद्युतीकरणावर गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यादृष्टीने पुढच्याच महिन्यात याची चाचणी घेण्यात येणार आहे.
सद्या इंधन कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने तसेच खर्च जास्त आहे. कोकण रेल्वेला इंधनापोटी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यावर उपाय म्हणून हा खर्च कमी होण्यासाठी विद्युतीकरणाची प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे.
या योजनेसाठी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी, खारेपाटण, कणकवली, थिवी याठिकाणी ट्रॅक्शन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच , माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी ही चार उपकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून वायरिंग पूर्ण झाले आहे.
तत्पूर्वी लॉकडाउन मुळे काम थांबलेले होते परंतु आता परत सुरू झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच त्यांच्याकडून अंतिम परवानगी देण्यात येईल. कोकण रेल्वेला विद्युतीकरणासाठी डिसेंबर २०२० ची कालमर्यादा देण्यात आली आहे.एप्रिलनंतर आता काम वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.